gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिवर्षी दि. २३ जुलै २०२३ रोजी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी महाविद्यालयाच्यावतीने लोकमान्य टिळक जन्मस्थान येथेअभिवादनपर कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्कृत विभागातील मीरा काळे, जान्हवी महाबळ, श्रद्धा भट, ऋग्वेद सरजोशी, सिद्धी ओगले, वरदा बोंडाळे, सिद्धी कोळेकर या विद्यार्थांनीगीतेचा १५ व्या अध्यायचे पठन केले. त्यानंतरश्री. महेश सरदेसाई यांनी पारंपरिक वेशात लोकमान्यांचीआरती केली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढयातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे, म्हणून दरवर्षी या अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांचे योगदान खूप मोठे असून. लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीत झाला ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. लोकमान्य टिळकांची ग्रंथसंपदा खूप मोठी असून, आपल्या विचार, लेखन आणि कृतीतून त्यांनी राजकीय-सामाजिक प्रबोधनाचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असे होते. यावेळी त्यांनी टिळकांचे गणितज्ज्ञ, संशोधक, खगोलशास्त्रज्ञ, पत्रकार, राजकारणी, विचारवंत असे विविध पैलू उलगडून दाखवले. लोकमान्यांचे विचार आणि कार्याचा वारसा याचे स्मरण ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या कार्यक्रमात र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रत्नागिरीतील उद्योजक श्री. आनंद भिडे, कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, कार्यक्रम समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एन.एन.एस व एन.सी. सी.चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पुरातत्व खाते, भिडे आणि जोशी कुटुंबीय, श्री. प्रसाद गवाणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रा. तेजश्री भावे यांनी ऋतुजा टेंभे-जोशी रचित लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील कविता सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. उद्योजक भिडे परिवाराकडून उपस्थितांसाठी मिठाईचे वाटप करण्यात आले.

Comments are closed.